
क्षणभंगूर
निर्दोषही शिक्षा भोगतात
देवाच्या न्यायालयात..
त्याला गोंडस नाव दिले जाते..
प्रारब्ध,नशीब..
आता अजून श्रेष्ठ दर्जा..
क्षणभंगूर ..जीवन..!
काश्मीर,पृथ्वी वरील स्वर्ग…
निसर्गाच्या सानिध्यात ..
आतंकवादी हमला..
दोष कुणाचा..?
प्रारब्ध,नशीब..
की त्याला ही तोच श्रेष्ठ दर्जा..
क्षणभंगूर..जीवन..!
विमान अपघातात..
पंखच जळाले श्वासांचे..
किती स्वप्न त्या राखेत मिसळले..
धुराच्या काळोखात
हवेत मिटले..
त्यानेच श्वास भरलेले..
संसार उजाडले..
दोष कुणाचा..?
प्रारब्ध,नशीब..
की इथेही तोच श्रेष्ठ दर्जा..
क्षणभंगूर.. जीवन..!
रेल्वे अपघात,
आय.पी.एल.धक्काबुक्की..
किती ह्या हृदयद्रावक घटना..
मरण इतकं स्वस्त झालंय का..?
मग जगणेच कठीण ना..!
शेवटी प्रश्न उरतोच..
दोष कुणाचा…?
प्रारब्ध,नशीब..
दुर्भाग्याचा लेखा स्वीकारावा..
की क्षणभंगूर जीवन म्हणत
देवाचाच अन्याय सहन करावा..
मान्य आहे असावी जाणीव मानवाला..
या क्षणभंगूर जीवनाची..
पण नसावी कधी कुणाची
अशी करुण कहाणी मरणाची..!
करुण कहाणी मरणाची..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
========





