Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननवी दिल्लीब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भसंपादकीय

असले ‘एकनाथ’ देवेंद्र फडणवीसांच्याच नशिबी का?

शिंदेंचा मेलोड्रामा अयशस्वी

0 3 3 3 9 2

असले ‘एकनाथ’ देवेंद्र फडणवीसांच्याच नशिबी का?

शिंदेंचा मेलोड्रामा अयशस्वी

काल महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी २ दिवस मुख्यमंत्री बनण्यासाठीचा सगळं आटापिटा निष्फळ ठरल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन ‘महाशक्तीपुढे’ नांगी टाकली. मोदी-शहांचे आभार मानत आपण कसे लोकप्रिय मुख्यमंत्री होतो हे पटवून देण्याचा आटापिटा केला. परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मनसोक्त भोगता आले, त्यांचा साधा उल्लेखही केला नाही. हा निव्वळ कोडगेपणा आणि कृतघ्नपणा आहे. खरंतर निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागले आणि भाजपला १३२ + ५ अपक्ष असे स्वबळावर १३७ जागा मिळाल्यावर कुठलाही नेता मुख्यमंत्री बनण्याचे शेखचिल्ली छाप स्वप्न पाहणार नाही. वास्तवात जगणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाने तर थेट अमित शहांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांना आपला पाठिंबा देऊन टाकला. परंतु भाजपच्या जीवावर ५७ आमदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी जो बालिशपणा केला, त्यामुळे महायुतीच्या महाविजयाला कुठेतरी गालबोट लागले. दाढीवाले बाबा हे सुद्धा विसरलेत कि आपल्या ५७ आमदारांमध्ये १०-१२ आमदार भाजपचेच आहे आणि आपले बहुतांश सहकारी हे देवेंद्र फडणवीसांचेच समर्थक आहे. तरीही एकनाथ शिंदेंनी २ दिवस जो काही मेलोड्रामा केला त्यामुळे त्यांचीच पदलोलुपता उघड झाली आणि ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पंक्तीत जाऊन बसले.

खरंतर निवडणुकीचे निकाल हाती येताच एकनाथ शिंदेंनी स्वतःहून देवेंद्र फडणवीसांना आपला पाठिंबा जाहीर करायला हवा होता. कारण २०१४-२०१९ या काळात जेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे खच्चीकरण करण्यासाठी पूर्ण ताकत लावली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना MSRDC ची जबाबदारी देऊन समृद्धी महामार्गासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी देत एकनाथ शिंदेंना राजकारणात जिवंत ठेवले. शिंदेंनी बंड केल्यांनतर गुवाहाटीला गेल्यानंतर अचानक मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदार असूनही पक्षहितासाठी त्याग करत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. नुसते स्वीकारलेच नाही तर उद्धव ठाकरेंना थेट अंगावर घेत फडणवीस शिंदेंच्या पाठीशी पर्वतासारखे खंबीरपणे उभे राहिले आणि राज्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. उबाठा आणि शिंदे संघर्षातही शिंदेंना कायदेशीर मदत केली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोठ्या भावाप्रमाणे सन्मान केला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्यात घडलेला प्रकार, सिंधुदुर्ग येथील महाराजांच्या पुतळ्याबद्दल घडलेला प्रकार, सरकारी तिजोरीतून एकनाथ शिंदेंच्या राजकीय कार्यक्रमांची रेलचेल, शिंदेंच्या मंत्री, नेते आणि आमदारांचे बेताल वर्तन यासगळ्यांवर पांघरूण घातले. याउलट कृतघ्न शिंदेंनी मनोज जरांगे शरद पवारांकडून सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीसांवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होता, तेव्हा स्वतःला अलिप्त ठेवत असुरी आनंद लुटला. रोहित पवारांची ट्रोल गँग जेव्हा देवेंद्र फडणवीसांबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत सोशल मीडियावर अपप्रचार करत होती, तेव्हा शिंदे शरद पवार आणि रोहित पवारांची कोरी निवेदने स्वीकारत फोटो काढत होते. उद्धव ठाकरेंनी तर उघड उघड फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला होता परंतु शिंदेंच्या दाढीत इतके विषारी साप निघतील असे वाटले नव्हते. होय आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेच अधिक जवळचे वाटायचे. परंतु मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी जो नालायकपणा केला ते पाहून संताप येण्याऐवजी त्यांची किळस आणि कीव करावी वाटते आहे. लोकसभेला मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने निवडणुकीचे नियोजन केले आणि ९९% हरलेला सामना परत आपल्या बाजूने निव्वळ फिरवलाच नाही तर विरोधकांना पार जमीनदोस्त करत मित्रपक्षांनाही घवघवीत यश मिळवून दिले, ते पाहता शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना अगदी खांद्यावर उचलून दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठीना आपले समर्थन कळवायला हवे होते. परंतु दाढी ठेवणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवाजी महाराज नसते, ती औरंगजेबही असू शकते हे आम्ही भाबडे हिंदुत्ववादी विसरूनच गेलो होतो.

असो, एकनाथ शिंदेंनी आता स्वतःच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आता त्यांना एकतर केंद्रात जावे लागेल किंवा भाजप आमदारांचा रोष पत्करत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करावे लागेल. तसे नाही केले तर सत्तेसाठी शिंदेंभोवती जमलेले त्यांचे आमदार त्यांना सोडून भाजपसोबत जातील. त्यामुळे परतीचे दोरही कापल्या गेलेले आहेत. शिवाय भाजपकडे अफाट बहुमत असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा असल्याने ते मविआत जाऊनही मुख्यमंत्री बनू शकत नाही. अमित शहांशी सलगी करून आपला कार्यभाग साधू पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजप आणि संघ अजूनही कळला नाही. त्यामुळे शिंदे आता चहूबाजूंनी आता चेकमेट झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना यापूर्वीही एका एकनाथाने निष्कारण डिवचले होते, त्याची आज काय अवस्था आहे निदान याचा तरी शिंदेंनी विचार करायला हवा होता. नशीब देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंसारखे खुनशी आणि पाताळयंत्री नाहीत, नाहीतर एकनाथ शिंदेंची काही खैर नव्हती. देवेंद्र फडणवीस अत्यंत संयमाने झाल्या प्रकारावर पडदा टाकतील आणि दमदारपणे पुढील पाच वर्ष सरकार चालवतील. परंतु गमतीदार गोष्ट हि आहे कि सगळेच पदलोभी ‘एकनाथ’ देवेंद्र फडणवीसांच्याच नशिबी का येतात?

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 3 9 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
20:46