अलिबागई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
बिगुल वाजला ना

0
4
8
2
8
4
बिगुल वाजला ना
बिगुल वाजला ना मतदानचा
नेत्यांची आता धावपळ किती..
कुठे जी हूजुरी कुठे मारामरी
कुठे पक्षातून विलग कुठे झाली युती..
मतदान आधी आश्वासनांचे
आणि घोषणाबाजीचे बंड…..
मतदानानंतर बदल घडून
सारा मामला होतो थंड…
गोरगरीब, खेडोपाड्यात
दाखवती रूप जसे आरस्पानी…
मतदान नंतर बदलती सारे अन्
नेते दिसू लागती सरड्यावानी….
सारख्या दलबदलचा राजकारणाने
विमनस्क अवस्थेत आहे मतदार..
जे एकामेकाचे कट्टर विरोधी
तेच झाले आज पक्के यार..
मताधिकार आपले राष्ट्रीय कर्तव्य
मतदार खरा लोकशाहीची शान..
आपलं एक मत घडवेल परिवर्तन
स्वबुद्धीने निर्णय घेऊन करा मतदान..
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
0
4
8
2
8
4



