Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

स्वीकार

वसुधा वैभव नाईक

0 4 0 9 0 3

स्वीकार

स्वीकार’ करणं म्हणजेच एखादी गोष्ट विना तक्रार मान्य करणे. हा स्वीकार कशाचा करायचा? तर स्वतःचा,इतरांचा, परिस्थितीचा करायचा आहे. परिस्थिती अनुकूल असू देत प्रतिकूल असू देत. आपल्याला फरक पडता कामा नये.
वाईट गोष्ट घडली तर हे माझ्याबरोबर का घडलं असा विचार करायचा नाही. संघर्ष करून पुढे जग जिंकायला जायचं. कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला जीवनामध्ये खंबीर पाय रोवता आला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे. कोणाचा आसरा मिळो न मिळो स्वतः ठाम राहायला पाहिजे. हे जेवढ्या लवकर आपल्या मेंदूला सांगू तेवढ्या लवकर आपण जीवनात उभे राहतो. निगेटिव्ह गोष्टी बाजूला सारतो.

जोपर्यंत वाईट गोष्टींचा आपण स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्याला उपायात्मक योजना आखाव्या लागतात. पण जेव्हा आपण त्या स्वीकारु तेव्हा नकळत आपल्या हातून तशा चांगल्या कृती घडत जातात. एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर बऱ्याच गोष्टी लादल्या जातात. वरिष्ठ आपल्याला सांगतात हे करा, ते करा. त्यांनी सांगण्यामागे सुद्धा एक हेतू असतो. तो म्हणजे ते काम आपण चांगले करणार आहे त्यांना माहीत असते. म्हणून ते आपल्याला हे काम देतात. म्हणून आपण असे म्हणायचे नाही मलाच का काम दिले हिला का नाही दिले? हे अगदी साधे प्रश्न असतात पण त्याला सामोरे जावं लागतं. बऱ्याचदा असं होतं की सारख आपलं नाव घेतलं जातं ठीक आहे म्हणायचं आणि पुढे जायचं. यालाच ब्रेन डेव्हलपमेंट असं म्हटलं. कोणत्याही कृतीचा चटकन स्वीकार केला की, आपल्या मनाला त्रास होत नाही, पर्यायाने मेंदूला त्रास होत नाही.

जीवनात आलेल्या इतर व्यक्तींच्या स्वभावा बाबत आपल्याला प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह विचार करून त्यांचाही स्वीकार करावा लागतो. सर्वच व्यक्ती समान नसतात. काही व्यक्ती आपल्या खरंच अगदी जवळच्या असतात. की ज्यांना आपण मनातलं बोलून आपण शांत होऊ शकतो. काही विशिष्ट सल्ला मिळू शकतो. त्यांना आपण यशाकडे वाटचाल करू लागलो तरी कोणताही त्रास, प्रॉब्लेम नसतो. पण जीवनात अशा काही व्यक्ती असतात की, आपण जर यशस्वी व्हायला लागलो तर त्यांना लगेच आपला त्रास होतो. त्यांना दुसऱ्याचे यश बघवत नाही. सर्व काही मलाच मिळाले पाहिजे. शाब्बासकी मलाच मिळायाला हवी. मीच सर्वात श्रेष्ठ. अशाही व्यक्ती असतात यांचा सुद्धा आपल्याला स्वीकार करून त्यांना समवेत घेवून पुढे जायचं असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करायचं नसतं.

उलट त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचे विचार काय आहे? त्याचा उलगडा करून घ्यायचा असतो. त्यांच्यातल्या चांगल्या गुणांना वाव द्यायचा असतो. त्यांच्यातले चांगले गुण आपण आत्मसात करायचे असतात. या चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला की ती लोक सुद्धा आपल्याबरोबर छान मैत्री करू शकतात. आपली मैत्री सफल होऊ शकते. अप्रत्यक्षरीत्या काही नकारार्थी भावनांमुळे माणूस स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. आनंदाला पारखा होतो. नकळत त्यांची गुलामगिरी स्वीकारून दुःखी होतो. तर इतरांशी आत्मीयतेने, सहकार्याने वागावे, तसे प्रयत्न जरूर करावे. प्रामाणिकपणे वागावे. “लोक आपल्याशी कसेही वागले तरी, त्यांच्याशी आपण चांगलेच वागावे”. आणि याचा स्वीकार करून समाजात मानाचे स्थान मिळवावे हे मात्र नक्की…!!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे