0
4
8
2
9
0
अंतरीचा उजेड
थकलेल्या मनाला स्वतःच औषध,
जे न बोलता सांगतं
“उठ, अजून संपलं नाही काही.”
धैर्य वेदनेच्या मुळाशीच उगवतं//१//
कधी आयुष्य इतकं तुटतं
आवाजही भरकटून जातो,
पण त्याच शांततेत स्वतःचा
खरा सूर अवश्य सापडतो//२//
लोक मध्येच सोडून गेले तरी
स्वतःचा हात स्वतःलाच धरावा लागतो,
आणि तिथेच घडतो खरा माणूस
चुका, वेदना, जिद्द यांनी तो घडतो //३//
प्रत्येक क्षण त्याला सांगतो—
“तू एकटा नाहीस, हे लक्षात ठेव,”
दु:खच जीवनाला देती नवं पान।
मनातला चांगुलपणा हाच खरा देव//४//
समोरच्याचं दु:ख ऐकण्यातच अर्धा उपाय,
हात धरून चालणं हेच सर्वात मोठं देणं।
मानवतेच्या उबदार शब्दांनी विझते भय,
तिथेच उमलतं मनाशी मनाचं जोडणं//५//
उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
0
4
8
2
9
0



