‘सोहंम’ म्हणजेच स्वःताशी असलेला सहज सवांद
मनिषा दतात्रय सुतार पिंपरी चिंचवड,पुणे

‘सोहंम’ म्हणजेच स्वःताशी असलेला सहज सवांद
जगणं कसं असावं? असा प्रत्येकाच्या मनात विचार येत असतो. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी संकल्पना, व्याख्या, काही तत्व आखलेली असतात. आयुष्य आपलं, श्वास आपला, जगणं आपलं असल तरी, मिळालेल्या जन्माचा नेमका गुढ अर्थ समजणं अवघडही आहे. आणि समजून घेणे सोपंही आहे. कारण साधेपणाचं जगणच लाख मोलाचं वाटत. ज्या कुळात, धर्मात आपण जन्माला आलो, त्याचा आयुष्यभर आदर राखावा व मान, सन्मान वाढविण्याचा प्रयत्न असावा. आपण ज्या कुंटुबाचा भाग आहोत, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जपण्याचा प्रयत्न असावा . प्रत्येक नात्यातअपेक्षा न ठेवता कर्तव्य चोख असावं. आपली ओळख ज्या कुळात जन्म झाला ते कुळ, ते कुटुंब असतं. त्याची प्रतिष्ठा जपणं प्रथम कर्तव्य असावं.
आपल्या आचारा- विचारातून त्यांचा मानसन्मान वाढवावा. संतसंगती असावी, त्याने फायदा तर आहेच. पण नुकसान मात्र होत नाही. दुर्जनापासून अलिप्त रहावे. त्याचा दुष्परिणामच होतो. माणूस समाजप्रिय प्राणी आहे हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे आपण समाजाचं देण लागतो हे नेहमी लक्षात असावं. सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असावा. भलेही आपल्याकडे पद नसेल; पण सर्वसामान्यातच असामान्य ताकद ओळखावी. सामाजिक उपक्रम , बंधुता , समता , एकता हि नितीमुल्ये जपावीत. ज्या परिसरात राहतो, त्या कर्मभूमीत आदर्श विचारावंताचे विचार रुजविण्याचा प्रयत्न करावा. आपण भलेही मोठे समाज सेवक नसू, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ज्ञानदान , अन्नदान , प्रामाणिक गरजूस आपल्या परीने अर्थिक मदत करावी.
आपल्या परीसराच्या प्रश्नांबाबत जागरूक नागरीक म्हणून त्याचा पाठपुरावा करावा. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असावी. मग पुढे कुणीही असो. कारण सावित्रीमाई अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी लढल्या, माँ जिजाऊ अन्यायी, अत्याचारी मोघल राजवटी विरुद्ध स्वराज्यासाठी लढल्या. झाँसीची राणी लक्ष्मीबाई, ‘मेरी झाँसी नही दुंगी ” म्हणत ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढल्या. तीच आदिशक्ती, स्त्रिशकती अंश आपल्यात जागृत ठेवावा. कारण मिळालेल्या या जन्मात मिळवायचं काय ?..तर मनाचा मोठेपणा, शुद्ध भावना आपल्या चित्तात समाधान रुजवतो.
कारण, ‘नातं जोडायचं ते मोहमायेशी नाही, तर आत्म्याचं परत्मामासोबत’. म्हणून देहातआत्मा आला आणि जन्म मृत्यूचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात वेदना कर्मातून येतात. त्यामुळे भगवंत एकचं सांगतो, “आपल कर्म चागलं असावं याकडे कटाक्षाने लक्ष असावं “. आपली ओळख पैसा, पद यावर नसून कर्मावर आहे. कारण मनुष्य जन्माचा अधिकार केवळ कर्मावर आहे, त्याच्या फळावर कधीही नाही. असेल ते स्वीकारून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे हाच कर्मयोग आहे. म्हणून भगवंत म्हणतात..
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि”॥
मनिषा दतात्रय सुतार
पिंपरी चिंचवड,पुणे
========



