0
4
8
3
0
0
त्या भूलथापा
घेऊ नको रे साखरचुंबन
चाखून होईल रे मधुमेह
झुकताच हसरी पापणी
संवेदना जागल्या रे मनी
गाठलास रे सागरकिनारा
अफलातून केलीस धमाल
अथांग तुझ्या रे मनाचा….
लागला नाही रे थांगपत्ता
डुबत गेले मीही तुझ्यात
परंतु सांगशील का खरं ?
आताच का लागलास टाळू ?
तू जवळ असूनही माझ्या
तडफडतोय रे जीव एकाकी
निश्चल मीच पर्वतासारखी
शहारते…बहरते…हरवते…
ऊन…वारा…पाऊस झेलत
कसं म्हणू तुला फुसका बार ?
येशील का रे घेऊन गजरा
विसरून जाईन दुःख सारं
नव्हत्या ना ‘त्या’ भूलथापा
विश्वास ठेवून जगते तुझ्यावर
फक्त या एकाच आशेने…
भेटशील रे त्या वळणावर ?
जाण्यापूर्वी रे मी सरणावर…
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
4
8
3
0
0



