“साथ शेवटपर्यंत …”
औरंगजेबाच्या क्रूरतेच्या काळोखात, संभाजी राजे उभे होते अभिमानात ।
यातना देणाऱ्या हातांना सुद्धा कधी झुकवली नाही आपली मान !
पण त्या छायेत एक सखा होता, शब्दांनी रण मांडणारा-कवी कलश होता। सुटू शकला असता… माघार घेऊ शकला असता, पण निष्ठेचं शस्त्र उचलून तो शेवटपर्यंत साथ देतो होता।
जिथे प्राणाचं मोल असतं धैर्याच्या बदल्यात, तिथे तो हसत होता मृत्यूच्या सामोरी जात। हा मित्र नशिबात असतो, नाहीतर नसतोच-कारण मतलबींच्या गर्दीत, सच्चेपण हरवतोच।
असा नसेल ना, तर नको कोणी जवळ, स्वतःची सावली पुरे आहे एकट्यालाही बल। नाही लागत प्रत्येक वाटचालीला साथ, कधी कधी एकटेपणाच देतो खऱ्या विश्वासाला हात।
हरवलेले चेहरे, खोट्या हसण्यांचं नाटक, त्यात राहण्यापेक्षा, स्वतःत जगणं असतं थाटात।
मित्र हवा, पण तो कलशासारखा, नसेल, तर एकटं चालणं असतं शाहीसारखं!
गणेश ज्ञानेश्वर माशाळकर,बी.एस्सी बाय टेक्नॉलॉजी, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर.
जिल्हा धाराशिव
===≠==



