0
4
8
2
9
0
फक्त तू खचू नकोस….
अपयशाच्या काळामध्ये
नैराश्याच्या नसावा थारा
मनाने खचून न जाता
व्हावे शितल शांत झरा
स्वप्न साकार करण्यासाठी
संकटावर कर तू वार
झाशीची राणी बनूनी
न डगमगता ध्येय कर पार
आयुष्याच्या वाटेवरती
येती सुख दुःखाची लाट
काढ पोखरून मार्ग यशाचा
निखाऱ्यातूनही फुलेल वाट
घेऊन डोळ्यात स्वप्नांना
सोबत आपण चालायचं
बळ मजबूत हातात आहे
प्रयत्नांवर विजय मिळवायचं
नवी पहाट उगवण्यासाठी
तेवत ठेवावी ज्ञानज्योत
गरुड भरारी घेऊनी आकाशात
यशस्वी किर्तीवंत हो जीवनात.
सौ. अर्चना राजू ईंकने
आरमोरी जि.गडचिरोली
=======
0
4
8
2
9
0



