
0
4
8
2
5
1
महाराज पुन्हा येऊ नका
राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या ना
विनवणी करतील जयंती दिनी
ढासळली आहे नीतिमत्ता अन्
दयनीय अवस्था केविलवाणी
पाहवले जाणार नाही कदापी
तुमच्याने आमची ही राजनीती
स्वार्थ साधून ते घर भरताहेत
राहिली नाही कसलीच भीती
तुम्ही आठरापगड जातीधर्माचे
मावळे घेऊन स्वराज्य स्थापीले
जातीपाती धर्माधर्मात आम्ही
आमचे मत विभाजन हो केले
अमानुष्य अन्याय, अत्याचारा
बळी पडतेय गोरगरीब जनता
अब्रू लुटतात,धिंडवडे काढतात
कायदा सुव्यवस्था न जुमानता
तेढ निर्माण झाले आहे धर्मात
बीज पेरलेले प्रत्येकाच्या मनात
समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता
लोकशाही तत्व येईना ध्यानात
बी एस गायकवाड
ता.पालम, जि.परभणी
=========
0
4
8
2
5
1



