Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरविदर्भ

इस शाम ऐ संजू का क्या कहना!; डॅा अनिल पावशेकर

स्तंभलेख व क्रीडा समीक्षक, नागपूर

0 5 1 6 5 2

इस शाम ऐ संजू का क्या कहना!; डॅा अनिल पावशेकर

स्तंभलेख व क्रीडा समीक्षक, नागपूर

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सुपर ऐट च्या अंतिम लढतीत टीम इंडियाने विंडीजचा थरारक पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात संजू सॅमसनने लाईफटाईम झुंजार खेळी करत विंडीजला नमवले आहे. अभिषेक, ईशान आणि सूर्या सारखे दिग्गज अल्पावधीतच माघारी परतले तरी संजूने द्रुढनिश्चयी खेळी करत टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म केले आहे. संघात नियमितपणे इनकमिंग आऊटगोईंग करण्यात येणाऱ्या संजूने अखेर आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखविली आहे. या विजयाने टीम इंडियाची सेमीफीयनलला इंग्लंड सोबत गाठ पडणार आहे.

झाले काय तर ही लढत जवळपास क्वार्टर फायनलची होती. इथे चुकीला माफी नव्हती. डू ॲार डाय परिस्थिती असताना ही लढत दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यातच टी ट्वेंटी आणि विंडीजचा संघ म्हणजे डेडली कॅाम्बिनेशन. त्यांचे फलंदाज म्हणजे निव्वळ रॅा पॅावर आणि बेधडक. वेड्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ असतात असे म्हणतात. याबाबतीत विंडीजच्या फलंदाजांना डबल वेडे म्हणावे लागेल आणि आयसीसीने ताकदीसाठी हॅार्स पॅावर ऐवजी विंडीज पॅावर ही दुरुस्ती करावी असे वाटते. सध्याचे त्यांचे फलंदाज ज्या ताकदीने फटके मारतात, त्यासाठी पंधरा क्षेत्ररक्षक सुद्धा कमी पडतात. अंगावरचा मच्छर आपण ज्या हळुवारपणे मारतो, तितक्याच सहजतेने ते लांबलचक, उत्तुंग षटकार मारतात.

या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अनेकदा बाजी मारली असल्याने आपला पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला की काय असे वाटत होते. कारण १८० धावां तिथे विजयी स्कोअर ठरत होता. त्यातच आपला ओपनिंगचा झिंगाचिका, अभिषेकचा बेभरवश्याचा फॅार्म. परंतु उत्तरार्धात ड्यू फॅक्टर डोक्यात असल्याने त्याचा फायदा होणार होता. विंडीजचा प्रारंभ दणदणीत नव्हता तरी धडधड वाढवणारा नक्कीच होता. एकवेळ सापाचे मुंडके छाटल्यावर त्याची बॅाडी शेपूट वळवळणार नाही परंतु फलंदाजीत विंडीजचे शेपूट काय करू शकते हे त्यांनी द. आफ्रिकेविरूद्ध दाखवून दिले होते. आजकालचे फलंदाज निव्वळ वेगाला भीत नाही, भीक घालत नाही. म्हणूनच गोलंदाजीतील विविधता काम करते. मग ते चेंज ॲाफ पेस, पेस ॲाफ असो किंवा वाईड यॅार्कर वगैरे वगैरे.

आपल्या वेगवान आक्रमणात बुमराहने निराश केले नाही पण पांड्या, अर्शदिपला मार बसल्याशिवाय ते सुधरत नाही. अर्शदिपने तिसऱ्या षटकात मार खाताच वाईड लाईन पकडली आणि अब्रू राखली. बाकी फिरकीत वरूणची जादू एकतर फिकी पडू लागली किंवा त्याची गोलंदाजी विरोधी गोलंदाजांनी डी कोड केली असावी. तरीही भारतीय गोलंदाजी ॲाक्सिजनवर आली की आपल्याला बुमराह शिवाय पर्याय नाही आणि हे त्याने कालच्या सामन्यात दाखवून दिले. बुमराह नसला की इतर गोलंदाज दात नख नसलेले वाघ सिंह होतात. नशीब समजा हेटमासर लवकर गारद झाला अन्यथा बाऊंड्री लाईन काही मीटर वाढवण्याशिवाय बीसीसीआय कडे पर्याय उरला नसता. बुमराहच्या बाराव्या षटकार विंडीजचे दोन फलंदाज बाद झाले नसते तर त्यांनी विसाव्या षटका पर्यंत टीम इंडिया चे तेरावे उरकून टाकले असते.

उत्तरार्धात आपली फलंदाजी म्हणजे केवळ जस्टिस फॅार संजू शो होता. टीम इंडियातील संजूला संधी हा अन्याय या शब्दाचा पर्यायवाची शब्द होऊ शकतो इतक्या वेळा तो आतबाहेर झाला आहे. टॅाप ॲार्डरची त्रिमुर्ती कोसळताच संजू सॅमसनचा स्वामी संजू झाला. या सामन्यात जणुकाही त्याच्या शरीर मनाचा विराट कोहलीने ताबा घेतला आहे असे वाटत होते. विराटसारखा द्रुढनिश्चय, चेस माईंडसेट आणि मुख्य म्हणजे फुट मूव्हमेंट. कधी बॅकफुट कधी फ्रंटफूट तर कधी ॲाफ, ॲान, लेग ला हलकेच फूट मूव्हमेंट करत त्याने कोणत्याही गोलंदाजाला सेटल होऊ दिले नाही, तर त्याच्यावर हुकूमत गाजवली. कुठलेही ॲग्रेशन नाही की मुठ आवळणे नाही की दातओठ खाणे नाही. सिंप्लीसिटी ॲट इट्स बेस्ट काय असते हे संजूच्या कालच्या खेळीत दिसून आले. संपूर्ण सामना म्हणजेच तब्बल ४० षटके पॅड लावून राहतांना त्याने दाखवलेली जिद्द, संयम, मॅच अवेअरनेस नक्कीच कौतुकास्पद आहे.

थोडक्यात काय तर कालचा सामना म्हणजे गोलंदाजीत बुमराह आणि फलंदाजीत संजू सॅमसन! खरेतर विंडीजला २०/३० धावा कमी पडल्या. शिवाय पॅावर प्ले मध्ये स्कोअर पुरेसा नव्हता. ओपनिंग जरी चांगली झाली तरी मधात बुमराहने दोन विकेट घेत स्पिड ब्रेकर लावले. जर स्कोअर २०० वर गेला असता तर आपल्या फलंदाजांची दमछाक झाली असती. अभिषेकचे अपयश येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढवून जाते, त्यातच इशानला सूर्यग्रहण लागले तर फलंदाजी कोण सांभाळणार? पुढच्या सामन्यात पुन्हा एकदा संजूच उभा राहणार काय? तसेच क्षेत्ररक्षणातली बोंबाबोंब कशी सुधारणार हा खरा प्रश्न आहे. भलेही अभिषेक ज्या सामन्यात झेल सोडतो तो सामना आपण हमखास जिंकतो पण काळ सोकावतो आहे. आपल्या फलंदाजांना विंडीज क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून रिटर्न गिफ्ट जरूर दिले परंतु पुढील सामन्यात हे अंगावर येऊ शकते. म्हणूनच टीम इंडिया जरी सेमीफायनलला पोहचली असली तरीही गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारताला नट बोल्ट कसून ठेवावे लागेल.

दिनांक ०२ मार्च २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे