0
4
8
2
9
7
मुक्तिसंग्राम
निजामाच्या जुलमाने
त्रस्त होती जनता
स्वातंत्र्य मिळूनही
गुलामीत होती जनता
दहशतीने रझाकारांनी
सुरू केले अत्याचार
सारी जनता दडपशाहीने
झाली होती बेजार
आंदोलनाचे नेतृत्व केले
स्वामी रामानंद तीर्थांनी
कार्य सुरू झाले मराठवाडा
मुक्तिसंग्रामची ज्योत पेटवुनी
पोलादी पुरुष पटेलांनी
कारवाईस सुरुवात केली
‘पोलीस ऍक्शन’ नावाने
ती इतिहासात अमर झाली
अनेक वीर अन् विरांगणा
मराठवाडा मुक्त करण्या लढले
हैदराबादी संस्थान अखेर
स्वतंत्र भारतात विलीन झाले
प्रांजली जोशी
विरार,जि.पालघर
0
4
8
2
9
7



