‘रंजना ब्राम्हणकर’ यांच्या ‘कविता तुझ्यासाठी’ काव्यसंग्रहाचे उत्सहात प्रकाशन
वैदर्भीय कवींनी आणली कवीसंमेलनात रंगत
‘रंजना ब्राम्हणकर’ यांच्या ‘कविता तुझ्यासाठी’ काव्यसंग्रहाचे उत्सहात प्रकाशन
वैदर्भीय कवींनी आणली कवीसंमेलनात रंगत
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
बिनधास्त न्यूज नेटवर्क
गोंदिया: मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूरतर्फे प्रकाशित झालेल्या ‘कविता तुझ्यासाठी’ या प्रसिद्ध कवयित्री रंजना ब्राम्हणकर अर्जुनी मोर, जि. गोंदिया यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (दि २४) अर्जुनी मोर येथे उत्साहात संपन्न झाला.
अर्जुनी मोरगाव येथील शिव रेसीडेन्सी येथील सभागृहात स्व.श्री राहुल ब्राह्मणकर यांच्या जयंती प्रित्यर्थ ‘कविता तुझ्यासाठी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा व कवी संमेलन घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घघाटक मा.श्री.लायकरामभाऊ भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया, अध्यक्ष मा. पद्मश्री श्री. डाॅ.परशुराम खुणे, भाष्यकार मा.श्री.डाॅ.गुरुप्रसाद पाखमोडे,कवी संमेलनाध्यक्ष मा.अंजणाबाई खुणे विदर्भाची बहीणाबाई प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा मंजुषाताई बारसागडे,श्री. रेशीम कापगते विदर्भ शिक्षक संघ अध्यक्ष,अॅड.दिलीप कातोरे, श्री.दामोदर चुटे, सौ.प्रमीला चुटे, मा.प्राचार्य श्री पठाण, पत्रकार श्री अश्विन गौतम मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्घघाटक मा. लायकराम भेंडारकर यांनी साहित्य, काव्य, नाट्य कलेला प्राधान्य देत नाट्यमंडळ स्थापन करण्याची मुंबई महाराष्ट्र शासनाकडे तरतूद असल्याचे सांगितले. लेखनीची ताकद सत्याला वाचा फोडणारी असते, असेही ते म्हणाले. भाष्यकार मा. श्री.गुरूप्रसाद पाखमोडे यांनी ‘कविता तुझ्यासाठी’ ह्या काव्यसंग्रहाचे सार व कवीच्या अंतरंगाची महती आपल्या भाष्यातून सांगितली. पद्मश्री डाॅ.परशुराम खुणे यांनी साहित्य, नाट्य, काव्य आणि माणसाचे प्रत्यक्ष जीवन दोन्ही एकमेकांशी अनुरूप आहेत. साहित्य कवी लेखन हे सत्य जीवनातील परखड असे रूप दाखवते.कविता तुझ्यासाठीच्या कवयित्री श्रीमती रंजना राहुल ब्राह्मणकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन डाॅ. विक्रम राखडे व डाॅ.प्रिती राखडे यांनी केले. कवी संमेलनाच्या अध्यक्षा मा.अंजणाबाई खुणे, प्रमुख पाहुणे हरीभाऊ शिवणकर,केवळराम हेमणे, यशवंत ब्राह्मणकर, यशवंत कोरे, शशीकला मेंढे, दिशा शिवणकर, प्रतिभा फुंडे, देवेंद्र हेमणे यांच्या उपस्थितीत कवींनी काव्य सादर केले. याप्रंसगी त्यांना सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन सुधा मेश्राम यांनी तर आभार ॠतुजा राहुल ब्राह्मणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया बोरकर,उमेश चुटे, प्रशांत चुटे, श्रद्धा चुटे यांनी सहकार्य केले.





