
0
4
8
2
9
3
बहर
लेखणी हाती घेतली मी
काव्य लेखनाला आला बहर..
शब्दमाळ गुंफू लागले मन
यमक जुळवीत सुरु झाला सफर..
काव्य रचना माझी सौंदर्यवती
ल्यायली शब्दांचे मोहक अलंकार…
पानावर पसरली काळी शाई
वाटते जणु तिचा दाट केशसंभार….
लयबद्ध ओळी रचल्या
त्याला कल्पनेची नाजूक किनार..
आशयपूर्ण रचनेसाठी कष्ट जीवापाड
तेंव्हा बहरतो हा भावनाविष्कार..
ओंजळीत चंद्र ,तारका घेऊनी
मी काव्य नभागंणावरी उधळले..
अंतरीचे भाव शब्दरूपात शिंपूनी
शृंगारिक काव्य जणु कस्तुरीसम दरवळे..
काव्य म्हणजे नाही गंमत
नाही फक्त यमकांची जुळवणी..
त्यासाठी पाहिजे साहित्य साधना
मग बहरते समृद्ध लेखन क्षणोक्षणी..
मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========
0
4
8
2
9
3



