ई-पेपरपरभणीमराठवाडासाहित्यगंध
अस्तित्वासाठी
0
4
8
2
9
7
अस्तित्वासाठी
स्वतःच्या अस्तित्वासाठी
जो तो धडपड करत आहे,
टिकवण्या अस्तित्व आपले
जिवाचे रान करतो आहे…
रखरखत्या वैशाख उन्हात
ताठ मानेने उभारला आहे,
केसरी ज्योतीच्या फुलांनी
पळस सजलाधजला आहे…
पानगळ झाली जरी वृक्षास
नवीन पालवी फुटते आहे,
मुळ्या रोवून खोल धरित्रित
तिन्ही ऋतूत टिकतो आहे…
हिरवीगार वनराई फुललेली
फुला फळांनी बहरते आहे,
शेती होते उजाड माळरानी
तिथेपण पाणी मिळते आहे…
ईवलासा जीव सुगरणीचा
खोप्यात जन्मास येत आहे,
अस्तीत्व निर्माण करायला
जीव झाडाला टांगते आहे…
शिक मानवा निसर्गाकडून
निसर्गही लढाई लढत आहे,
तू उगाच खचून रडणे नको
अस्तित्वासाठी लढणे आहे…
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
7



