0
4
8
2
9
3
संकटातील सत्य
काय होईल माणसाचे?
मनात सतत विचार येती.
मृत्यू झाले आता सोपे,
नवीन रोगाची झाली भरती.
करोनाच्या महामारीने
जगणे शिकविले खरे;
संकटात नसते सोबती,
आप्तेष्ट धरती अंतर बरे.
कर्करोग गिळू पाहतो
संपूर्ण मानवजातीला;
बिघडे पर्यावरण संतुलन,
दोषही मानवजातीला.
न मुजोरी निसर्गापुढे,
कळले असेल तुला;
विज्ञानाचा अविष्कारही,
दिसतो मूल्यहीन झालेला.
मिळाले आयुष्य जेवढे,
तेवढेच जग आनंदाने;
मित्रा, निसर्गाशी भांडणे
नसते कधीच परवडणारे.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
=========
0
4
8
2
9
3



