विचारणार कोणी तरी असलं पाहिजे..
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव
विचारणार कोणी तरी असलं पाहिजे..
लहानपणी आई – वडील होते, शाळेत जाते वेळस बहिण- भाऊ होते,काॅलेजला जाताना आजी होती.आता आईच्या, बहिणीच्या आजीच्या, मुलीच्या स्वरूपात पत्नी आहे. कठीण परिस्थितीत सदा सोबत राहते.आनंदातही दुःखातही सोबत असते. कुणीतरी असलं पाहिजे
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला…
सकाळी घरातून बाहेर शाळेत जाताना
लवकर या असं सांगायला..
कंटाळा आलाय हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर
सुखरूप पोचले चा फोन करायला…
उशीर होत असेल, तर
जेवून घ्या असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मन उकलून सांगणारा ऐकणारा
मन स्वच्छ करायला…आई-बहिण-मुलगी-आजी-पत्नीच असते.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==============



