पाऊसधारा’ कवी संमेलन यशस्वी होतांना’; रत्नाकर तिडके
‘पाऊसधारा’ कवी संमेलन यशस्वी होतांना’; रत्नाकर तिडके
आपल्या संस्थेतर्फे आपण आयोजित केलेला कथासंग्रह प्रकाशन, आणि पाऊसधारा कविसंमेलन, आपल्या अथक परिश्रमाने, व नियोजनबद्धता, सर्वाचे आपल्या या साहित्यिक चळवळीवर असणारे प्रेम, यामुळे यशस्वीपणे संपन्न झाला. या सुंदर, कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. याबद्दल संस्थेचे व आपले खूप खूप आभार.
मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या अनेक प्रतिभावंत नवोदित कवी, लेखक, यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून संधी मिळाली, ही आनंददायी बाब अनुभवता आली, पत्रकारिता व सोशल मीडिया यांचा आपल्या प्रतिभेने केलला वापर, व यामध्ये मिळालेले यश, सहकार्य करणारा जिवाभावाचा मित्र परिवार , ही,विलोभनीय नाविन्यपूर्णता , दिसून आली, मराठी साहित्य क्षेत्रात साहित्य निर्मितीच्या प्रेरणा येथूनच आकाशगामी होतील, या शुभेच्छासह सर्वांचे अभिनंदन.



